२.४.१५

रोस्टेड

मागच्याच आठवड्यात उठलेला वाद आता थोडा शमला आहे.याला कारण असं असेल की त्या लोकांनीही नांगी टाकून, जे काही लोकं अक्रमक झाले होते त्यांच्या मागण्या मान्य केल्या. ही कृती करण्यामागचं खरं कारण काय?की निव्वल भ्याडपणाच?

तुम्हाला नक्कीच समजलं असणार मी कशाबद्दल बोलतोय ते.AIB roast, ज्यामुळे मागच्या आठवड्यात सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांना काहीतरी उद्योग मिळाला.त्यांचं दुर्दैव की हा वाद फार काळ टिकला नाही.

मी सर्वात पाहिले ‘roast’ हा प्रकार (‘प्रकार’च म्हणावा लागेल ना? अजून कोणते शब्द आहे त्या प्रकाराला परिभाषित करायला?) जवळ जवळ १० वर्षांपूर्वी पाहिला होता.एका मित्राने मला अत्यंत चविने दाखवला होता.पमेला एंडरसन या अभिनेत्रीचा होता तो.तो प्रकार पाहणं माझ्यासाठी तेव्हतरी धक्कदायक होतं.म्हणजे जगात असं पण काहीतरी होतं, त्याकरता लोकं तयार होतात.म्हणजे त्यात सहभागी व्हायला आणि ते बघायलाही.अश्लील वाभाडे ओढून, खाजगी आयुष्य सर्वांसमोर आणून,त्यावर कोणीही टीका टिपण्णी करायला लोकं तयार होतात ह्े पाहून भयंकर आश्चर्य वाटलं.सर्वात शेवटी प्रत्येकाचं ठरलेलं एक वाक्य होतच की ‘ तू किती धीट आणि चांगली आहेस की ह्े असं करायला तयार झालीस’ किंवा ‘ तुझ्यामुळे आज आपण इतके इतके डॉलर कमावले जे या या संस्थांना देऊन लोकांचं भलं करणार आहोत’ वगैरे..त्यांनी खरंच पैसे जमावून संस्थांना दान करून त्यामुळे काही गरजू लोकांच्या आयुष्याचं भलं झालंही असेल..त्याबद्दल दुमत नाही.पण तो कार्यक्रम काही मनाला फारसा पटला नाही आणि हळू हळू तो माझ्याकडून विसरलाही गेला.


मग आलं AIBचं roast!मला AIBche काही काही यूट्यूबवरचे विडियो खरंच फार आवडले आहेत.त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर मनात होताच.त्यात परंपरिक मध्यमांना बाजूला ठेवत, भारतात त्यांनी पूर्णपणे इंटेरनेटच्या मध्यमातून काही लाख लोकांचा प्रेक्षकवर्ग जमावला आहे.ह्े ही किती महत्वाचं!


पण हा ही roast काही फार रुचला नाही.काही वेळानंतर तो चित्रपट सृष्टीतल्या लोकांना घेऊन अजून एक भपकेबाज कार्यक्रम केला आहे ह्े जाणवलं.फरक इतकाच की यात आश्लील शब्दांचा वापर केला होता.कुठलंही ‘अवॉर्ड फंक्षन’ असेल तर कलाकारांचे त्यात अपमान होताना, खिल्ली उडवताना आपण पाहतोच!ह्े ही तसलंच!

म्हणून, तो विडियो पाहिल्यानंतर, मी लपटॉप बंद केला,काहितरी वाचलं,मित्रांशी गप्पा मारल्या ज्यामध्ये त्या विडियोबद्दल फारसं बोललो नाही आणि नंतर झोपी गेलो.कारण AIB ने काय करायचं याचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.ते त्यांनी केलं.आता ते मला आवडलं नाही, तर नाही आवडलं!त्यांचा कार्यक्रम थांबेल असं कशाला वागेन?(अर्थात माझ्याकडे तेवढं मनुष्याबलही नाही, आणि असलं तरी या कामसाठी ते वापरावं अशी इच्छा तर मुळीच नाही).’ आपली संस्कृती भ्रष्ट होते आशा कार्यक्रमांमुळे’ ह्े तर कारण आजूनच हास्यास्पद.ही म्हणणारी लोकंच सार्वजनिक दही हंडी आणि गणेशोत्सव भरवतात, ज्यामध्ये मोठ्या आवाजात हिन्दी चित्रपटातली गाणी लावली जातात, काही अभिनेत्र्या येऊन त्या गाण्यांवर नाचून जातात.हे चालतं?याने नाही ‘संस्कृती’ भ्रष्ट होत?बरं ती गाणी पण कोणती?’बेबी डॉल’, ‘मुन्नी बदनाम’, 'फेविकॉल' वगैरे.ह्े सगळं कसं काय चालतं?की तो त्यांचा कार्यक्रम असतो म्हणून कोणी बोलायचं नाही?किती दांभिकता!


बरं या कार्यक्रमांना टाळता पण येत नाही. ते त्यांच्या मोठ्या आवाजाने लक्ष वेधून घेतातच.या लोकांची पोच पण इतकी असते की बातम्यानच्या वाहिन्यांना पण त्यांचं ‘लाईव’ प्रक्षेपण दाखवावं लागतं!निदान हा roast बघायचा की नाही, किती बघायचा या सगळ्याचा निर्णय प्रेक्षकांच्या हाती होता. सुरुवातीला पाटी होती की जे असणार आहे ते घाणेरडं (त्यांनीच ‘filth’ हा शब्द वापरला) आहे!म्हणजे संस्कृतीला धक्का वगैरे द्यायचा की नाही ही निदान प्रेक्षकांच्या हातात होतं!

वोल्टेर ने किती महत्वाचं म्हणून ठेवलं आहे - I do not agree with what you have To say, but I will defend To the death your right To say it. ते लक्षात ठेवून माझा पूर्ण पाठिंबा AIB लाच होता.माझ्यासारखा विचार करणारे अनेक होते याची खात्री आहे मला – ‘ विडियो आवडला नाही पण तुम्हाला तो करायचा हक्क आहे.’ व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडे आहे.आणि ते जपणं ही आपलीच जबाबदारी आहे.नुसतं स्वातंत्र्य मिळून कसं चालेल?ते जपायची जबाबदारी पेलायला नको?

त्यामुळे जे AIB ने पुढे केलं ते माझ्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत बेजबाबदार वर्तन होतं.हा प्रकार करताना जितकं धारिष्ठ्य दाखवलं, निदान तितकं तरी ते टिकवण्यात दाखवायला हवं होतं.काही लोकांना न आवडणं ह्े सहाजिकच आहे.त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटणं पण सहाजिक आहे.म्हणून त्याच्यासमोर लगेच झुकून कसं चालेल? ’धूम ३’ या चित्रपटाची त्यांच्या विडियोद्वारे थट्टा करायची परवानगी नाही मिळली म्हनून याच AIB ने यशराज सारख्या बलाढ्य कंपनीच्या विरोधात विडियो केला होता.त्यांचा राग, निषेध त्यांनी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला होता. त्या AIB ने इतक्या लवकर हार मानायला नको होती.मग नंतर ‘ आम्ही तो विडियो का काढला?’ याचं लांबलचक पत्राद्वारे उत्तर देऊन काही फरक पडत नाही.कृती महत्वाची.कारण ती लक्षात राहते.

‘घाशिराम कोतवाल’ किंवा ‘ सखारम बाईंडर ’ अजूनही लक्षात का राहिली आहेत?ती चांगली नाटकं आहेत हा भाग वेगळा, पण त्या दोन नाटकाच्या संघांनी त्या त्या वेळेला विरोध पत्करून प्रयोग सुरू ठेवले.किती अवघड असेल ह्े!ही खरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी!

‘ हो आम्ही जे केलं तेच आम्हाला करायचं होतं.आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही आणि आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू’ असं पत्र लिहिलं असतं AIB ने तर किती बरं झालं असतं.त्यांच्याकडे इतकं मोठं माध्यम आहे,इतका प्रेक्षकवर्ग आहे तो त्यांनी का वापरला नाही?ढोंगी नेत्यांच्या दाबाने त्यांनी शेपूट टाकायला नको होती.त्यांच्या माध्यमाद्वारेच एक सणसणीत उत्तर द्यायला हवं होतं.ही संधी आता त्यांनी गमावली.आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या लोकांचा आदर आणि प्रेमही.

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा