हा खूप वेळेला बोलला गेलेला विषय असणार. (मीच अनेक वेळा बोललो आहे यावर, मित्रांमध्ये,
काही लेखांमध्ये उल्लेख पण केले आहेत.) अनेक थोर लोकांनी यावर विचारमंथनं केली असणार.
जितक्या उत्साहाने, कौतुकाने ‘तिकडच्या’ नाटकांबद्दल बोलले असणार, तितक्याच उत्साहाने
आपल्याकडच्या उदासीनतेबद्दल बोलले असणार. कसं आपल्याकडे शासनाचं लक्ष नाहीये, भ्रष्टाचाराने
गुरफटलेल्या देशात कसं कलेसाठीचा, सांस्कृतिक उपक्रमांसाठीचा पैसा खाल्ला जातो, कसं
अनेक नाट्यगृहांसाठी परवानगी मिळाली आहे पण ती भ्रष्ट नगरसेवकाने आपलं नवीन घर बांधण्यासाठी
वापरली, वगैरे वगैरे.
कारणं अनेक आणि एकापेक्षा एक! मी पण मान्य करतो की मी पण त्यातलाच एक होतो
आत्ता-आत्तापर्यंत. तिकडची नाटकं पाहिली की जितकी ती कलाकृती पाहण्यातून आनंद मिळायचा,
तितकाच आपल्या न कर्तेपणाचा त्रास व्हायचा. तो त्रास माझ्या सृजनशीलतेच्या आवाक्याचा
किंवा कर्तृतवहीनतेचा नव्हता. तर याचा होता की हे असा इतकं महत्वं या कलेला आपल्या
देशात मिळालेलं पहिलं नाही. मिळालं असतं तर आज आपणही काहीतरी वेगळं, नवीन करू शकलो
असतो, अधिकाधिक विचार करू शकलो असतो, स्वतःला प्रगल्भ करू शकलो असतो. असे काहीसे
विचार येत रहायचे.
पण काहीच दिवसांपूर्वी एका वैयक्तिक कारणासाठी नेडरलॅंड्स या देशाला जायचा
योग आला. त्यामुळे त्याच्या अवती-भवती असलेल्या देशांना पण भेट देऊन येऊ असा विचार
केला आणि तसा तो आमलात आणलाही! ही माझी पहिलीच वेळ होती, स्वखर्चाने परदेशी जायची आणि
फिरायची. या आधी प्रत्येक वेळेला नाटकाच्या प्रयोगांच्या निमित्तानेच परदेशी जाणं झालं
होतं. या दोन्हीमध्ये फरक असा, की नाटकाच्या निमित्ताने जायचं म्हंटलं की
कितीही प्रयत्न केला तरी ‘सुट्टी’चा मूड येत नाही. प्रयोगनंतर येतो, पण बऱ्याचदा प्रयोग
झाला की दुसर्य़ा दिवशी तिकडनं परतायचं असतं. त्यामुळे पटकिनी तिकडचं एक नाटक बघितलं
जातं आणि आपल्या तिकडे झालेल्या प्रयोगाची आणि त्या नाटकाची तुलना करत विमानात बसलं
जातं. मग पुढे अनेक दिवस तेच विचार.
पण या वेळेस वेगळं झालं जरा. फक्तं फिरायचं या हेतूने तिकडे गेलो होतो. तिकडे
चाललोय हे कळल्यावर काही लोकांनी विचारलंही, ‘कोणती फेलोशिप?’. असो! तर सांगायचा मुद्दा
हा की यावेळेस दुसरी कुठलीही जबाबदारी नव्हती, मजा करायची सोडून!
तिकडे लोकांच्या घरी राहिल्याने, अनेक लोकांना भेटल्याने, प्रवास करण्यासाठी विविध साधने वापरून काही गोष्टी प्रकर्षाने आणि नव्याने जाणवल्या. जे मला तिकडच्या नाटकंबद्दल वाटत होतं, ते फक्त नाटकांपुरतच मर्यादित नव्हतं. तर एकंदरीत रहाणीमानाबद्दल आणि लोकांच्या वृत्तीबद्दल वाटत होतं. जसं एखाद्या गरीब माणसाला श्रीमंत व्हायची ओढ असते, तसं. म्हणजे फक्त नाटकंबद्दल, नाट्यागृहांबद्दल बोलून कसं चालेल? आपल्याकडे रस्ते नीट आहेत का, ते साफ आहेत का, बागा नीट ठेवल्या आहेत का, अपण अगदी साधे वाहतुकीचे नियम पाळतो का? या आणि अशा मूलभूत प्रश्नांची पाहिले उत्तरं होकरार्थी व्हायला पाहिजेत .मग हळू हळू कलेकडे लक्ष देता येईल!
हे सगळा बोलत असताना, त्यांच्या आणि आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार
नाही. कारण इतिहासच आपला वर्तमान ठरवतो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या सगळ्या देशांमध्ये
फार पूर्वीपासून सुबत्ता आहे. त्यांनी आशिया आणि आफ्रिकेमधल्या अनेक देशांवर काही शतके
राज्य केलं. दुसर्य़ा महायुद्धानंतर गोष्टी बदलल्या. अमेरिका, ऑस्ट्रेलिया सोडून बहुतांश
राष्ट्रांना नव्याने सुरुवात करावी लागली. मग ते राज्य करणारे देश असो, किंवा आपल्यासारखे,
नव्याने स्वातंत्र झालेले असो.
फरक इतकाच की तेव्हा स्वातंत्र्य मिळालेले देश अजूनही झगडत आहेत. खूपच कमी
असे देश असतील ज्यांना तेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि ते आत्ता सुबत्ता उपभोगत आहेत.
त्याउलट पश्चिम युरोप मध्ये झपाट्याने प्रगती झाली. मग ते युद्ध जिंकणारे इंग्लंड किंवा
फ्रान्स असो किंवा हरणारा जर्मनी.
मला कल्पना आहे की ते देश तसे लहान आहेत, लोकसंख्या कमी आहे, भाषा एक आहे.
पण तरी प्रगती करण्याची मूलभूत इच्छा असल्याशिवाय असं होत नाही हे अमान्य करताच येणार
नाही.
हा इतिहासाचा तास घेण्यामागचं कारण असं, की तिकडे जी
महायुद्धानंतर प्रगती झाली ती त्यांच्या इतिहासाला न विसरता झाली. आजही तिकडे १६व्या-१७व्या
शतकातल्या इमारतींमध्ये लोकं राहतात. ज्या इमारतींचं, वास्तूंचं महायुद्धामध्ये नुकसान
झालं, त्या जश्याच्या-तश्या बांधल्या गेल्या. तिकडचा इतिहास ते नुसता विसरत नाहीत,
तर जपतात. अगदी अट्टाहास वाटावं इतकं करतात. याचं एक उत्तम उदाहरण आहे. जर्मनीमध्ये
हिट्लर आणि नाझी लोकांनी अनेक लोकांवर अत्याचार करण्यासाठी वापरण्यात आलेले ‘concentration
camps’, या अमानवी आणि क्रूरपणाचा कळस असलेल्या जागा ही तिथे जपून ठेवल्या आहेत.
त्याची सखोल माहिती तिथे अभ्यास करण्यासाठी ठेवली आहे. या जागा सर्वांनी येऊन बघण्यासाठी
खुल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तिकडे आत जायला कोणतेही शुल्क आकारले जात नाही! इतर
सर्व ठिकाणी काही ना काही पैसे घेतले जातात पण या जागांचा इतिहास पाहता, त्यातून निधी
मिळवण्याची त्यांची इच्छा नाही.
तो इतिहास त्या लोकांनी मान्य केला आहे. हे किती महत्वाचं आहे!
वाडे पाडून ‘re-development’ च्या नावाखाली होणाऱ्या इमारती
आपल्याकडे आहेत. जुनं पुणे हे आता जुनं दिसतं का? इतिहास हा फक्त पुस्तकांमध्येच असतो
का?आपल्याकडे रोजच्या आयुष्यात जरा नियोजन येऊ शकेल काय?हे आणि असे अनेक प्रश्न
मला पडतात.आणि ‘ नाटकाशी या सगळ्याचा काय संबंध?’ हा प्रश्णा कदाचित तुम्हाला पडला
असेल! तर संबंध आहे. जर आपण आपला इतिहास जपणार नसू, तर आपण काहीही जपू शकणार नाही.
ना रस्ते, ना वाडे, ना नाटक. काहीच नाही! आत्ताची लोक आज अशी का वागतात? कारण त्यांनी
काल त्यांच्या मोठ्यांना तसंच वागताना पाहिलं असतं. हे मी सर्वसामान्यांविषयी बोलतोय,
ज्यांची संख्या सर्वांत जास्त असते. (म्हणूनच ‘सर्व सामान्य’).
'नका राहू मग या देशात!' असं म्हणेलच कोणीतरी. पण आता
त्याला उशीर झाला, माझी व्यक्त होण्याची भाषा आता बदलणं कठीण आहे! आणि का असा विचार
करायचा? माझ्यमते यावर उपाय एकच
‘Be
the change you want to see.’ असा कोणीतरी म्हटलं आहेच. त्यामुळे माला जॉ
बदल घडावा असं वाटतं तसंच मी वागणं, करणं गरजेचं आहे - नाट्यगृहात आणि नाट्यगृहाबाहेरही!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा